निष्कर्ष

भारत देश एक परिपक्व लोकसत्ताक राज्य म्हणून अध्याप विकासनशील स्थितित आहे, जेव्हा आपला देश अपल्या विचारस्वतंत्र्या निश्चयपूर्वक अभिव्यक्त करण्याचा प्रयत्न करत आहे, आपल्या समस्यांवर नियंत्रण करण्याची इच्छा निश्चयपूर्वक अभिव्यक्ति करत आहे. आणि अशा समाजिक प्रणालीकडे चालला आहे जी विभिन्न प्रकारच्या लोकांचे सह-अस्तित्वाच्या विश्वासास निग्रहपूर्वक अभिव्यक्त करेल व सामाईक नियतिच्या दृष्टिकोनाची भागीदार बनू शकेल. भाषा हा बहुविध परंपरेचा आत्मा आहे व हीच बहुभाषिता आमच्या जगण्याचा मार्ग आहे. भारतीय भाषांच्या विकासास राष्ट्राद्वारे आमच्या उन्नतिचा एक महत्वपूर्ण भाग म्हणून पाहिले पाहिजे जो जनतेच्या लोकतांत्रिक सहभागात वाढ करेल आणि एक महान राष्ट्राच्या रूपात आमच्या अस्तित्वाची ठेव सिद्ध होऊ शकेल. आमच्या संस्कृतिने सदैव भाषाअध्ययनाचे महत्त्व समझले आहे. वैदिक काळात तर ‘ज्ञान’ च्या सहा शाखां पैकी चारः शिक्षा (या शब्दाचा अर्थ ध्वनिविज्ञान आहे, पण अध्याप सामान्यत: शिक्षणासाठी वापरला जातो.), व्याकरण – “व्याकरण”, निरूक्त – व्युत्पत्ति शास्त्र , आणि छन्द “छन्द शास्त्र” भाषाशी संबंधित होते. भारतीय व्याकरणकारांनी केलेले कार्य (संस्कृत आणि तमिळ दोन्हीत) वास्तविक उच्च दर्जातले होते. ज्याने भाषेच्या वैज्ञानिक अध्ययनाची आधारस्तंभ स्थापित केला आणि बऱ्याचशा आधुनिक विचारधारा आमच्या पूर्वाजांच्या कार्यातून निरंतर लाभ घेत आहेत. ही तीच वेळ होती जेव्हा भारतात ज्ञान-आधारित पाठ अनुवादाद्वारा आशियाच्या विविध भागात पोचले. हेच ते साधन आहे ज्याला आम्ही १८ व्या आणि १९ व्या शतकात भारतात पाश्चिमात्य विचारधारा आणण्यासाठी प्रयोगात आणले, आणि वास्तवात त्याच अंतिम शतकात त्या ज्ञानाचा विस्फोट पहावयास मिळाला. पश्चिमेकडून आमच्या देशात साहित्य आणि ज्ञानाचे उर्ध्व आणि समानांतर प्रवाह झाला आहे. आम्ही – बऱ्याच स्थितित आणि अधिकतर विषयात– अध्याप मूळ इंग्रजी संहीता शिकवल्या जातात. आम्ही अशा परिस्थितीचा सामना करत आहोत, जिथे महानगरांच्या बाहेर अनिवार्य रूपात स्थानिक भाषेत शिक्षण दिले जाते, परंतु त्या भाषेत साधन- सामग्री उपलब्ध होणे कठीण आहे. इंग्रजी ही संप्रेक्षणाची व दळणवळणाची भाषा आहे व मोठ्या स्तरावर तिचा प्रसार झाला असला तरी शिक्षणाचे कायदेशीर माध्यम म्हणून ती पुरेशी स्वीकारली गेली नाही. प्रत्यक्षात शिक्षणाची भाषा व ज्या भाषेत शिक्षण दिले जाते यात बरीच तफावत असल्याने, अध्यापनाच्या भाषेत बदल हा शाळा महाविद्यालयातील गंभीर प्रश्न बनला आहे.

विकासशील कार्यक्रमांचे एक प्रमुख क्षेत्र तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पाहीले जाऊ सकते. आमची भाषा आणि व्याकरणिक विवरण प्राकृतिक भाषा प्रक्रियेला सहायता देण्यासाठी कार्पस आणि यांत्रणा उपलब्ध करण्यासाठी फायदेशीर ठरेल. आम्ही माहिती तंत्रज्ञानाच्या जगात मोठे पाउल उचलले आहे. आणि ही सुविधा मशीन सहाय्य अनुवादाच्या क्षेत्रातील कर्यक्रमात उपयुक्त झाली पाहिजे. कि समस्त संबंधित एजंसीज सर्व भारतीय भाषांना तांत्रिक उपकरणांशी जोडण्याचा पूर्ण प्रयात्न करणार अशी अपेक्षा आहे. जो निश्चित रूपात समाजाच्या सशक्तीकरण आणि अनुवाद कार्यास गती देण्याच मदत करेल.

भाषा मानवी जीवनासाठी एक वरदान आहे. जी स्थान व काळात सेतु निर्माण करते. करीता आपण अशा विघातक शक्तिपासून सावधान राहणे की आवश्यकता आहे जी नेहमी, भाषिक विभाजन व द्वेष उत्पन्न करू पाहतात. भाषा आमचे साधन आहे, व बहुभाषिता एक संपत्ती आहे, आणि आंम्हाला असे वाटते की माणूस म्हणून आपले भाग्य, आपले भाषा आणि ज्ञानाचा अन्योन्य संबंध आहे, याच भाषे व ज्ञानाद्वारे आम्ही आमचे भाग्य बदलू सकतो आसा संदेश आपण सर्वांनाच दिला पाहिजे. आम्ही अशी संस्कृति निर्माण केली पाहिजे जिथे एक भाषेतून दूसऱ्या भाषेत ज्ञानाचे आदान-प्रदान सुलभ होऊ शकेल. वर सांगीतल्या प्रसाणे राष्ट्रीय अनुवाद अभियान ज्ञान आधारित संशोधनाच्या विकास आणि शैक्षणिक आदान-प्रदानाबरोबरच भारतात सर्वांगीळ भाषिक विकासाठी एक उपयुक्त उपकरण होऊ शकते.